Monday, January 12, 2015

Miyan ki malhaar ...

We are once again in the territory of Rohail Hyatt - Coke studio. In the sixth season of the coke studio Pakistan, Rohail tried something different. He put forward an ensemble of artists in this song with four singers, a house band, two musicians from Nepal and two guitar players. He transformed this Hindustani Classical song in to a rock performance. The first song of this blog was "Bole re Papihara" from "Guddi" . This song was composed in raag "Miyan ki Malhar". Thus this is very close to me.  

Song starts with a simpler rendition by Ayesh Omar. She says she learned this from her master when she was young so it is simple. The beats catch on with the chorus. We have a break of pace with flute solo and then Fariha Parvez joins in with Umand Ghumand . This raag has a big story behind it. They say Miyan Taansen in the court of Akbar sang this raag and rain came down. Thus it got it's name which had a word Malhar in it which means rain or Monsoon. The dholak behind is played by Babar Ali Khanna. He starts here and continues with the rock. Which is performed by two guitar solos and alapi by Rustam Fateh Ali Khan. The song ends on such a high note that you fell the rain is actually falling !

    

Saturday, December 6, 2014

Kuch Dil Ne Kaha ...

This is one of those melodies which I discovered recently. In my younger days I had never heard songs from movie 'Anupama', may be just 'Dheere dheere machal E dile bekarar'. I knew this movie from it's mention by 'Guddi' .  When I first heard this song it stuck there and after nearly six months, it is still in my mind.

Hrishida, before he started making comedies filmed some dramas, Anupama is one of those dramas which has his favorite Dharmendra and Sharmila with Deven Verma and David. Hemantda always astounds me with his haunting melodies. This song is a perfect example of those haunting melodies. It doesn't have too complex structure, music doesn't overpower magic Lata creates, it stays in the shadow, highlighting her touching voice. Even Lata underplays her voice while singing "ai si batten hoti hai". Sharmila is strolling in hills of Mahabaleshwar, there is no hurry, she knows Dharam is watching but she continues to stroll. Lata creates a humming melody for this situation perfectly.

Jaywant Pathare was Hrishida's favorite cinematographer. He received Filmfare award for Anupama. His brilliance in camera angle and lighting is evident in this song. He has used softer lenses to glorify close ups of Dharam and Sharmila. No wonder they were one of the screen god and goddess of their time. Still the lens did not lose any beauty of Mahabaleshwar hills. Pathare understands he needs to show Mahabaleshwar while focusing on actors. In some long shots we can see picturesque valley behind Sharmila, it feels like we are standing next to Dharam and looking at Sharmila with beautiful background. If anybody is learning glorification with subtlety, they need to study this song deeply. I don't know how many more days this song is going to haunt me but hear it and watch it and tell me if it is haunting you too!

          

Sunday, March 2, 2014

Mile Sur Mera Tumhara...

Those were the days of Doordarshan in India. Diverse dramas, comedies, children programs, and a short messages from Lok Seva Sanchar Parishad. The national integrity and the cultural diversity of India was showcased by these messages and some of these became superhits of the 80's and 90's. One of the most important song was "Mile sur mera tumhara". It was written in various languages and sung by prominent singers from these states with the cultural references at the background. At the end it was all tied together by a great voice of Lata Mangeshkar. Recently I read article of Ashok Patki about the origin of this song and I can not help but to share the whole article here. The original rights and article belongs to Ashok Patki and Marathi daily Loksatta. The article in Marathi describes how the song was composed and sung by different singers on different days and how they joined it together to make this wonderful masterpiece. I really like this song and I am actually proud of this song as I use it sometimes to show the diversity of Indian culture to my International friends.





एके दिवशी रात्री वैद्यनाथन् यांचा फोन आला. त्यांचा फोन आला की मी ओळखायचो- नवीन जिंगल आलेलं असणार त्यांच्याकडे! मला म्हणाले, 'अशोक, कागज-पेन्सिल लो और एक नया जिंगल लिख लो.' मी म्हटलं, 'एक मिनिट!' कागद घेतला, पेन घेतलं आणि म्हणालो, 'हा बोलिए!' त्यांनी सांगायला सुरुवात केली, 'मलिकसाहब का जिंगल है. और इस में बहुत सारी भाषाएं आनेवाली है.. एकही जिंगल में.'मी विचारलं, 'वो कैसे?' ते म्हणाले, 'तुम लिख तो लो!' मी लिहायला सुरुवात केली. जिंगलचे शब्द असे होते-
'मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा..'
मी म्हटलं, 'आगे?'
ते म्हणाले, 'अभी इतना ही है. इसकी दो-तीन धुनें उन्हे सुनानी है. और इसका बेस क्लासिकल होना जरुरी है.'
मी म्हटलं, 'ओके. कब तक सुनाना है?'
ते म्हणाले, 'कल शाम को मीटिंग है. उस में दो-तीन धुनें सुनानी है. कल पांच बजे वेस्टर्न आऊटडोअर स्टुडियो में पहुँच जाना.'

शब्द हातात पडल्यावर त्याच्या चालीची प्रक्रिया माझ्या मनात लगेचच सुरू होते, हे आता सगळ्यांना ठाऊक झालं होतं. मी यमन रागात एक चाल बांधली. दुसरी भीमपलासमध्ये व तिसरी भैरवीत. (जी आता टीव्हीवर वाजते ती!) सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी तिन्ही चाली ऐकल्या. भैरवीतली चाल सर्वाना आवडली. 'वाह! क्या बात है!' मग त्याची १२-१३ भाषांमध्ये स्क्रिप्टस् लिहून होणार, हेही ठरलं. सर्वाना हिंदीतील जिंगल पाठवली गेली. 
काही दिवसांनी नाथन्चा पुरत फोन : 'सब लँग्वेज रेडी है। इस दिन वेस्टर्न आउटडोअर में रेकॉर्डिग करनी है.' 

मलिक स्वत: संगीताचा जाणकार होता. त्याचा गळाही बरा होता. पं. भीमसेन जोशींना तो एकटाच भेटायला गेला. त्यांना त्यानं ती चाल ऐकवली. मग पंडितजींनी आपल्या परीने ती बसवली. आम्हाला- म्हणजे मला वा नाथन्ना पंडितजींना शिकवण्याची तसदी घ्यावी लागली नाही. सकाळी दहा वाजता रेकॉर्डिगच्या दिवशी पोहोचलो तेव्हा बघतो, तर पंडितजी एका कारपेटवर दोन तंबोरे वाजवणारे आणि तबल्यावर नाना मुळे असे बसून रियाज करत होते. मी आश्चर्यचकित झालो. 
'त्यांना ही चाल कशी माहिती?'
मलिक म्हणाला, 'मी टेप ऐकवली त्यांना. त्यांनी ती आपल्या परीने बसवली आहे.' 
मी म्हटलं, 'ओके.' साधारण एकेक तासाने एकेका भाषेतलं रेकॉर्डिग करायचं ठरलं होतं.
पंडितजींसाठी ४५ सेकंदांचा वेळ दिला होता. रेकॉर्डिग सुरू झालं. आम्ही त्यांना सांगितलं की, 'तुम्हाला हात केला की गाणं सुरू करा.' ते 'हो' म्हणाले. पण मजा अशी, की त्यांना हात केला की ते तंबोरेवाल्यांना हात करायचे व नंतर गाणं सुरू व्हायचं. या खटाटोपात वेळ वाढायची. परत त्यांना सांगायचो, 'हात केला की गाणं सुरू झालं पाहिजे.' त्यावर ते 'हो' म्हणायचे. पण पुन्हा तेच व्हायचं. त्यांचंही बरोबर होतं. सूर मिळाल्याशिवाय कसे गाणार ते? मग मी दमण सूदला (रेकॉर्डिस्ट) सांगितलं, 'त्यांना त्यांच्या हिशोबानं गाऊ दे. आपण कुठून सुरू करायचं तिथून टेप कापून टाइमिंग बघू या.' जेव्हा 'टेक् ओके' झाला तेव्हा सर्वजण खूश झाले. पंडितजींचा भारदस्त आवाज, सुंदर चाल, नाना मुळेंचा तबला.. सगळं जमून आलं होतं. 

त्यानंतर काश्मिरी भाषेचा सुपरवायझर आला. तोच लेखक आणि तोच गाणार होता. प्रोडय़ूसर मलिकचा एकच आग्रह होता- 'मीटर बदललं तरी चालेल, पण ऐकताना 'मिले सूर'ची ओरिजिनल सुरावट ऐकतोय असं वाटायला हवं.' त्यामुळे दीपचंदी, दादरा, खेमटा, केहरवा अशा अनेक मीटरमध्ये भाषांची विविधता नटलेली असली तरी ऐकताना ती एकच सुरावट वाटायची. काश्मिरी भाषेतील रेकॉर्डिग करताना असं लक्षात आलं की, काश्मीरचं मूळ वाद्य संतूर सांगायला आम्ही विसरलो आहोत. पुष्कळ प्रयत्न केला. फोनाफोनी झाली. पण संतूर वाजवणारा कोणी मिळेना. आमचे साइड ऱ्हिदम-प्लेअर दीपक बोरकर यांच्याकडे हार्प होता. ते म्हणाले, 'यावर संतूर इफेक्ट निघेल. आणि सर्व तारा भैरवीतच लावल्यामुळे हात किंवा स्ट्रायकर कुठेही पडला तरी तीच सुरावट ऐकू येईल. अन् दोन बारचा तर इन्ट्रो होता!'
मग मी आणि अ‍ॅरेजर धीरजने दोन पेन्सिली मागवल्या आणि आम्ही दोघांनी जे वाजतील ते सूर वाजवले. मस्त वाटला इफेक्ट! तेच फायनल झालं. गायक काश्मिरीच असल्याने जसा हवा तसाच रंग त्या भाषेला आला. 

त्यानंतर कविता कृष्णमूर्ती व पंकज मित्रा यांच्या आवाजातलं बंगालीतला पोर्शन केला तेव्हा मलिकने सांगितलं, 'इस में ऱ्हिदम वगैरा नहीं रखना.' 
आम्ही विचारलं, 'का?'
तर म्हणे, 'बंगाली जरा सुस्त प्रकृतीचे असतात. त्यांचं सगळं राजेशाही असतं.' म्हणून त्यांनी जेव्हा 'शूट' केलं तेव्हाही ट्रेनमधून जी माणसं उतरतात तीही स्लो मोशनमध्ये दाखवली आहेत. मला वाटलं, मलिकचं पेपरवर्क किती पक्कं आहे! शूटिंगच्या अगोदर ते असणं फार गरजेचं असतं. याचा प्रत्यय आम्हाला प्रत्येक भाषेच्या वेळी यायचा. अमुक भाषा म्हणजे तिचं टायमिंग ६ सेकंद, हिचं ७।। सेकंद, या भाषेचं ९ सेकंद.. अशी विभागणी असे. मी आणि कविता दोघेही त्यावरून भांडायचो- '७।। सेकंदांचे ८ झाले किंवा ६ वा ७ झाले तर काय फरक पडणार?' त्यावर त्याचं उत्तर असे, 'आपको नहीं पडता है, लेकिन मुझे पडेगा.'
'बरं बाबा, करतो प्रयत्न त्यात बसवण्याचा,' म्हणून आम्ही कामाला लागायचो.

त्यातला पंजाबी भाषेतला जो भाग आहे तो खुद्द मलिकच्या बहिणीने गायला आहे. मस्त खणखणीत आवाज आणि पंजाबी भाषेतील नजाकत तिच्या गळय़ात होती. मराठीतलं 'तुमच्या आमच्या जुळता तारा' या ओळीला मी चाल लावेपर्यंत सुषमाने पुढची ओळही म्हटली. मी म्हटलं, 'अरे वा! आता तू कम्पोझरही झालीस की!' सगळेचजण हसायला लागले. तिला थोडंसं लाजल्यासारखं झालं. 
म्हटलं, 'खरंच! छान आहे. आपण तसंच ठेवू या.' यात माधव पवारांनी ढोलकीचा असा काही ठेका लावलाय, की मराठमोळ्या लावणीचा ठसका त्यात प्रत्यक्षात उतरला होता.

तामीळ, तेलगू, मल्याळम्, कन्नड भाषांतील गाण्यांसाठी आणि सुपरव्हायजर म्हणून ती- ती माणसं हजरच होती. रघू व कुरुविला अशी दोन गायक मंडळी व एम. पी. शर्मा, नानप्पन व बाकी भाषेवर प्रभुत्व असणारी मंडळी तिथे हजर होती. आम्ही आजपर्यंत मद्रासी भाषा म्हटली की मृदंगम्, मोरसिंग, मंजिरा, वीणा अशी वाद्यं वापरत असू. पण इथे या चार भाषांचं रेकॉर्डिग करताना खूप काही शिकायला मिळालं. एखादी भाषा करायला घेतली की त्यासाठीच्या वाद्यांचा मेळ बघून तो सुपरवायजर सांगायचा, 'आमच्या इथे मृदंगम् वाजत नाही, घटम् वाजवतात.' दुसऱ्या भाषेतला सांगायचा, 'आमच्याकडे तावील् वाजवतात.' तिसरा सांगायचा, 'आमच्याकडे खंजिरा वाजवतात.'
दक्षिणात्य भाषा करताना खूप मजा यायची. 'मिले सूर मेरा तुम्हारा' या नऊ अक्षरांसाठी त्यांची २०-२५ अक्षरं असायची. त्यामुळे ठेका बदलल्याशिवाय मलिकने दिलेल्या वेळेत बसणं कठीण होतं. मग आम्ही ते दीपचंदीत बसवलं. दुसरं खेमटय़ात बसवलं. आणि हे सर्व कम्पोझिशन तिथल्या तिथे व्हायचं. थोडासा ताण होता, पण काम करताना खूप मजा आली. कविता, सुषमा, रघू, कुरुविला, वादक कलाकार सगळय़ांचीच मदत होत होती. 
सर्व भाषा संपल्या. 

आता फक्त हिंदीतलं 'सूर की नदीयाँ हर दिशा से बहके सागर में मिले.. बादलों का रूप लेकर बरसे हलके हलके' हा अंतरा रेकॉर्ड करायचा बाकी होता. लतादीदी तो गाणार होत्या. पण त्या तेव्हा भारतात नव्हत्या. मलिक म्हणाला, 'माझी शूटिंगची डेट फिक्स आहे. मी एवढा वेळ नाही थांबू  शकत. मला कवितेच्या आवाजात करून द्या. मग फायनल आपण दीदींच्या आवाजात करू.' मग त्याचं रेकॉर्डिग झालं. त्याचं शूटिंगही झालं. 
महिन्याभराने मला नाथन्चा फोन आला, 'परसो सुबह आठ बजे दीदी डबिंग करने के लिये आ रही है. वेस्टर्न आऊडडोअर  पहँुच जाना!'
अकराच्या दरम्यान दीदी आल्या. सोबत उषाताई होत्या. संजीव कोहली (मदनमोहनचा मुलगा) आले. मग चहापाणी, गप्पागोष्टी झाल्यावर कामाला सुरुवात झाली. अनेक टेक् झाले तरी गाणं 'ओके' होईना. टेक् झाला की उषाताई माझ्याकडे बघायच्या. माझं एक बोट वर असायचं. मग त्या दीदींना सांगत, 'दीदी, अजून एक घेऊ या.' 
त्यानं दीदी वैतागल्या. 'काय होतंय काय? माझं काय चुकतंय?' 
मग उषाताई आणि मी बाहेर सिंगर रूमकडे गेलो. माझी लताबाईंशी ओळख करून देण्यात आली. 'दीदी, हे अशोक पत्की.' दीदी म्हणाल्या. 'हां! कुठेतरी नाव ऐकलंय!' 
म्हणाल्या, 'काय चुकतंय?'
मी म्हटलं, 'तसं चुकत काही नाही, चाल बरोबर आहे, पण जिथे पॉझ घेतला आहे, तिथे तो यायला हवा. जिथे मिंड घेतलीय कवितेने- तिथे ती तशीच यायला हवी. कारण त्याच्यावर शूटिंग झालेलं आहे.'
म्हणाल्या, 'मग गाऊन दाखवा मला.' अरे बापरे! आली का पंचाईत! तरीही धीर करून ऐकवलं. 
म्हणाल्या, 'ठीक आहे. बघते प्रयत्न करून!' 
मी 'सॉरी' म्हटलं आणि आतल्या मॉनिटर रूममध्ये सटकलो. त्यानंतर दुसराच टेक्  'ओके' झाला. त्याच दिवशी दीदींचं शूटिंगही वेस्टर्न आऊटडोअरमध्ये होतं. छान सफेद साडी, त्याला तिरंगी झालर.. याचं पहिलं 

टेलिकास्ट स्वातंत्र्यदिनी होणार होतं. १९८८ साल होतं ते. तेव्हापासून आज इतकी वर्षे झाली तरी पुन्हा पुन्हा हे गाणं बघणारे, ऐकणारे लोक भेटतात. 
आम्ही या गाण्याचे तेरा भाषांतले तुकडे करून दिले. पण त्यांना जोडण्याचं मुख्य काम लुई बँक्सने केलं. ते जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर आलं तेव्हा सगळेच अवाक्  झाले. कविता-सुषमाचा मला फोन : 'अशोकजी, ये अपनने किया है इसका भरवसा ही नहीं होता.'

मलिकसाहेबांची संकल्पना- दिग्दर्शन, पियूष पांडे यांचे शब्द, मी, नाथन िव लुई बँक्स्चं संगीत. त्यातही लुई बँक्सला १०० पैकी २०० गुण! कारण त्याने जी माळ गुंफली आहे आणि शेवटचं 'जय हे, जय हे!' त्यानं असं काही उंचीवर नेऊन ठेवलं आहे त्याला तोड नाही!

'राष्ट्रगीताच्या तोडीचं हे जिंगल झालं आहे,' असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा आयुष्य सार्थकी लागलंसं वाटतं. कित्येक र्वष हे गाणं कुणी बनवलं, हे कोणाला माहीत नव्हतं. मी एवढय़ाचसाठी गप्प होतो, की हे खरं काम वैद्यनाथन्चं होतं. पण त्यांनी २० वर्षांपासून कम्पोज् करणं सोडून दिलं होतं. माझ्याआधी पंकज मित्राकडून ते कम्पोज् करून घेत. माझी ओळख झाल्यापासून मीच त्यांचं सारं काम करायचो. मला कधी माझं-तुझं वाटलं नाही. गुरुदक्षिणा म्हणूनच मी काम करायचो. 

जाता जाता एक किस्सा सांगावासा वाटतो. त्यानंतर मलिकने देस रागावरही 'मिले सूर'सारखं काहीतरी करावं म्हणून मला गळ घातली. शब्द होते- 'बजे सरगम हर तरफसे गुंज बनकर..' मलिक म्हणाला, 'इस में तुम्हे जितना टाइम चाहिये, ले सकते हो।' 
मी म्हटलं, '१५-२० सेकंद तरी पाहिजेत.' सर्व मोठमोठे कलाकार होते. रामनारायणजी, हरिप्रसाद चौरासिया, अमजद अली खान, रविशंकरजी, पं. भीमसेन जोशी, पं. शिवकुमार शर्मा, अल्लारखॉं, झाकीर हुसेन. काही शास्त्रीय नृत्यांचे परफॉर्मन्स. पण.. 'मिले सूर'ची मजा त्याला आली नाही. जे ५-६ सेकंदांत सांगून गेलो तेच आता १५-२०-२५ सेकंदांत झाल्यामुळे कंटाळवाणं झालं होतं. तेव्हा मलिक म्हणाला, 'आता वेळेचं महत्त्व लक्षात आलं ना?' 

http://www.loksatta.com/lokrang-news/my-music-388398/ 

Saturday, February 8, 2014

Get Lucky...

Daft Punk is always one of my favorite electronic music band. Over the years they have created some masterpieces. This year's Grammy awards were totally belonged to them and their new song 'Get Lucky'. This song is combination of the new tunes and the style of 80's disco. I guess you will find many nostalgic people craving for that disco music. But the most important part is Get Luck finds the place in the hearts of the millennial too. It represents the hipness of any generation. Basically speaking it takes control of your legs and hands and makes them move - this is power of Daft Punk's music. Voices of Pharrell Williams and Nile Rodgers with great guitar vibes takes this song on the next level.  No wonder Gut Lucky got lucky in Grammy awards 2014 and won Record of the Year award.









Get Lucky!!!     

Sunday, January 19, 2014

राजा ललकारी अशी घे ... Raaja lalakari ashi ghe

शाळेत असताना बरीच मराठी गाणी ऐकली जायची. तसेही संगमनेर हे ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम असलेले गाव होते त्यामुळे त्याकाळी आलेल्या "अरे संसार संसार" चित्रपटातील गाणी आवडीने सगळीकडे लावली जायची. एक सुंदर ग्रामीण चित्रपट आणि रंजना व कुलदीप पवार यांचा तितकाच सुंदर अभिनय.

या सुंदर अभिनयाला जोड होती अप्रतिम गाण्यांची. अनिल-अरुण यांनी ज्या चित्रपटांतील गाण्यांचे सोने केले त्यांमध्ये हा अग्रभागी असेल. जगदीश खेबुडकरांची रचना तुम्हाला त्या शेतावर घेऊन जाते. जरी ते गाणे तुमच्यासमोर नसले तरी ती ललकारी ऐकताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नायिका गोफण फिरवताना दिसते. तसेच नायक नांगरताना आणि मोट वाहताना दिसतो. त्या गाण्यात आपले नायक नायिका या शिवाराबरोबर आमचे प्रेम पण फुलू देत असे म्हणतात. खेबुडकर यात शेतीचे  आपल्या जीवनपद्धतीमध्ये असलेले महत्व बरोबर पकडतात. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले जीवन हे शेती आणि पावसावर अवलंबून आहे. सगळे सणवार, आयुष्यातील महत्वाच्या घटना या शेतीशी निगडीत आहेत. खेबुडकरामधला कवी काळी माय आणि तिचे अनंत उपकार अतिशय सुंदरपणे व्यक्त करतो.

या अश्या सुरेख गाण्याला सुश्राव्य केले आहे ते अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजांनी. ती गाण्याच्या सुरवातीची ललकारी आणि त्यातील आपल्या नयकबद्दलचे प्रेम अनुराधा पौडवाल सुरेल पणे दाखवून देतात आणि त्यांचा कणखर प्रियकर अश्या कुलदीप पवारांना सुरेश वाडकरांचा आवाज चपखेल बसतो.

एक सुंदर सुश्राव्य गीत - दूरदर्शन वरील चित्रगीताची आठवण जागवणारे.

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याची
माझ्या सजनाला कळू दे

सूर भेटला सूराला, गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा, शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे

थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे            

(धन्यवाद: आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/Song/Raja_Lalakari_Ashi_Ghe )











Saturday, December 28, 2013

तुमको देखा तो ये खयाल आया …

एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे. असा नायक साकारला होता फारुख शेख नी.

मुंबई मधील एका वकिलाचा तरुण मुलगा ज्याने स्वतः कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि वकिली सुरु केली. पण त्या काज्ज्या खटल्यांमध्ये याचे कलाकारी मन काही रमेना. कॉलेज जीवनात भरपूर नाटके केल्यामुळे तशा ओळखी होत्या आणि अनुभवही होता. त्या अनुभवावर त्याला 'गर्म हवा' मध्ये एक पात्र मिळाले. त्या चित्रपटातील त्याचा अनुभव पाहून सत्यजीत रायनी त्याला त्यांच्या 'शतरंज के खिलाडी' मध्ये घेतले. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट चळवळ सुरु होती तो त्याचा उदयाचा काळ ठरला.

त्यानी ७० आणि ८० च्या दशकांत बरेच सामान्य माणसाला जवळचे वाटणारे चित्रपट केले त्यात आम्हाला तो जवळचा वाटला तो 'साथ साथ' मध्ये आणि 'चष्मेबद्दूर' मध्ये. यापैकी साथ साथ मध्ये त्यांनी लग्नानंतर जवाबदारीने माणूस कसा बदलतो आणि मग त्याला त्याची हाव अजून खाली खेटते हे अत्यंत परिणामकारक रीतीने दाखवले. चष्मेबद्दूर मध्ये तीन कॉलेज कुमार असताना हा त्यातला एक साधा सरळ सज्जन मुलगा होता. मुलीला भेटल्यानंतरचा सुरवातीचा नवखेपणा आणि नंतर भांडणानंतरचे नैराश्य त्याने उत्तमरीतीने साकारले. त्याची खर्या जीवनातील सहचारिणी त्याला कॉलेज मध्ये नाटकातच भेटली त्यामुळे बहुतेक त्याला ते साकारणे अवघड गेले नाही.

नंतरच्या काळातही तो सतत कार्यमग्न राहिला. 'जी मंत्रीजी' ही मंत्री आणि त्यांच्या सचिवांवर आधारित विनोदी मालिका केली. त्याचबरोबर 'जीना इसिका नाम हैं' हा मुलाखतींचा कार्यक्रम ही केला. २००९ मध्येच त्याला 'लाहोर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे तो अजूनही उमेदीतच होता असे मी म्हणेन. त्याचे असे अचानक जाणे म्हणजे आपल्या कॉलेज जीवनातील एक मित्र सोडून जाण्यासारखे वाटते आहे.

                                  

Thursday, December 12, 2013

Mala Ved Laagale ...

A teen love story, a simple Marathi girl next door, a rowdy boy - you just need some great songs in this mixture to make a perfect romantic movie.  And Timepass combines all these ingredients to make the perfect blend. Mala Ved Laagale is picturized on Ketaki Mategaonkar and Prathamesh Parab. They make the perfect couple described earlier. Director Ravi Jadhav has selected the usual canvas of a rainy day but he elevates it to the next level by painting a real life middle class neighborhood and two lovers madly in love (Ved = madness).

The song is composed by Chinar-Mahesh. They have created the true modern but still a warm in heart melody for this song. Swapnil Bandodkar is one reliable performer in Marathi movies now. The true surprise in this song is the beautiful voice of Ketaki. We all knew she has a great voice but this song gives her great exposure to the mainstream singing besides kids' songs. She has handled the music very well and complimented Swapnil's voice. You can say on screen and in singing she has became a true celebrity of Marathi film industry in no time.





Enjoy!!