Sunday, January 19, 2014

राजा ललकारी अशी घे ... Raaja lalakari ashi ghe

शाळेत असताना बरीच मराठी गाणी ऐकली जायची. तसेही संगमनेर हे ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम असलेले गाव होते त्यामुळे त्याकाळी आलेल्या "अरे संसार संसार" चित्रपटातील गाणी आवडीने सगळीकडे लावली जायची. एक सुंदर ग्रामीण चित्रपट आणि रंजना व कुलदीप पवार यांचा तितकाच सुंदर अभिनय.

या सुंदर अभिनयाला जोड होती अप्रतिम गाण्यांची. अनिल-अरुण यांनी ज्या चित्रपटांतील गाण्यांचे सोने केले त्यांमध्ये हा अग्रभागी असेल. जगदीश खेबुडकरांची रचना तुम्हाला त्या शेतावर घेऊन जाते. जरी ते गाणे तुमच्यासमोर नसले तरी ती ललकारी ऐकताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नायिका गोफण फिरवताना दिसते. तसेच नायक नांगरताना आणि मोट वाहताना दिसतो. त्या गाण्यात आपले नायक नायिका या शिवाराबरोबर आमचे प्रेम पण फुलू देत असे म्हणतात. खेबुडकर यात शेतीचे  आपल्या जीवनपद्धतीमध्ये असलेले महत्व बरोबर पकडतात. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातले जीवन हे शेती आणि पावसावर अवलंबून आहे. सगळे सणवार, आयुष्यातील महत्वाच्या घटना या शेतीशी निगडीत आहेत. खेबुडकरामधला कवी काळी माय आणि तिचे अनंत उपकार अतिशय सुंदरपणे व्यक्त करतो.

या अश्या सुरेख गाण्याला सुश्राव्य केले आहे ते अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजांनी. ती गाण्याच्या सुरवातीची ललकारी आणि त्यातील आपल्या नयकबद्दलचे प्रेम अनुराधा पौडवाल सुरेल पणे दाखवून देतात आणि त्यांचा कणखर प्रियकर अश्या कुलदीप पवारांना सुरेश वाडकरांचा आवाज चपखेल बसतो.

एक सुंदर सुश्राव्य गीत - दूरदर्शन वरील चित्रगीताची आठवण जागवणारे.

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी, मन भरून गेलंया
ओढ फुलाला वार्‍याची, जशी खूण इशार्‍याची
माझ्या सजनाला कळू दे

सूर भेटला सूराला, गानं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या, हासू तुझ्या गालावर
भरजरीचा हिरवा, शेला पांघरून नवा
शिवार हे सारं खुलू दे

थेंब नव्हं हे घामाचं, त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती
न्याहारीच्या वखुताला, घडीभर इसाव्याला
सावली ही संग मिळू दे            

(धन्यवाद: आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/Song/Raja_Lalakari_Ashi_Ghe )











Saturday, December 28, 2013

तुमको देखा तो ये खयाल आया …

एक गरीब मध्यममार्गी विद्यार्थी, आपले एम ए चे शिक्षण घेणारा. छंद म्हणून शायरी करणारा. आपल्या घरापासून दूर कॉलेज असणाऱ्या शहरात राहणारा. नेहमी चहासाठी कॅन्टीन मध्ये दोस्तांबरोबर गप्पा मारत बसणारा. त्या नायाकामध्ये आणि आमच्यात खूप साधर्म्य होते कॉलेज जीवनात त्यामुळे की काय पण इतर बी ए पास आणि नुसत्या गाड्या उडवणाऱ्या हिंदी चित्रपट नायकांपेक्षा तो खूप जवळचा वाटायचा. जरी त्याच्या चित्रपटांत आणि आमच्या कॉलेज जीवनात एक-दीड पिढीचे अंतर होते तरीही तो जणू आपले प्रतिनिधित्व करतो आहे हे पाहून बरे वाटायचे. असा नायक साकारला होता फारुख शेख नी.

मुंबई मधील एका वकिलाचा तरुण मुलगा ज्याने स्वतः कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि वकिली सुरु केली. पण त्या काज्ज्या खटल्यांमध्ये याचे कलाकारी मन काही रमेना. कॉलेज जीवनात भरपूर नाटके केल्यामुळे तशा ओळखी होत्या आणि अनुभवही होता. त्या अनुभवावर त्याला 'गर्म हवा' मध्ये एक पात्र मिळाले. त्या चित्रपटातील त्याचा अनुभव पाहून सत्यजीत रायनी त्याला त्यांच्या 'शतरंज के खिलाडी' मध्ये घेतले. ज्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये समांतर चित्रपट चळवळ सुरु होती तो त्याचा उदयाचा काळ ठरला.

त्यानी ७० आणि ८० च्या दशकांत बरेच सामान्य माणसाला जवळचे वाटणारे चित्रपट केले त्यात आम्हाला तो जवळचा वाटला तो 'साथ साथ' मध्ये आणि 'चष्मेबद्दूर' मध्ये. यापैकी साथ साथ मध्ये त्यांनी लग्नानंतर जवाबदारीने माणूस कसा बदलतो आणि मग त्याला त्याची हाव अजून खाली खेटते हे अत्यंत परिणामकारक रीतीने दाखवले. चष्मेबद्दूर मध्ये तीन कॉलेज कुमार असताना हा त्यातला एक साधा सरळ सज्जन मुलगा होता. मुलीला भेटल्यानंतरचा सुरवातीचा नवखेपणा आणि नंतर भांडणानंतरचे नैराश्य त्याने उत्तमरीतीने साकारले. त्याची खर्या जीवनातील सहचारिणी त्याला कॉलेज मध्ये नाटकातच भेटली त्यामुळे बहुतेक त्याला ते साकारणे अवघड गेले नाही.

नंतरच्या काळातही तो सतत कार्यमग्न राहिला. 'जी मंत्रीजी' ही मंत्री आणि त्यांच्या सचिवांवर आधारित विनोदी मालिका केली. त्याचबरोबर 'जीना इसिका नाम हैं' हा मुलाखतींचा कार्यक्रम ही केला. २००९ मध्येच त्याला 'लाहोर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे तो अजूनही उमेदीतच होता असे मी म्हणेन. त्याचे असे अचानक जाणे म्हणजे आपल्या कॉलेज जीवनातील एक मित्र सोडून जाण्यासारखे वाटते आहे.

                                  

Thursday, December 12, 2013

Mala Ved Laagale ...

A teen love story, a simple Marathi girl next door, a rowdy boy - you just need some great songs in this mixture to make a perfect romantic movie.  And Timepass combines all these ingredients to make the perfect blend. Mala Ved Laagale is picturized on Ketaki Mategaonkar and Prathamesh Parab. They make the perfect couple described earlier. Director Ravi Jadhav has selected the usual canvas of a rainy day but he elevates it to the next level by painting a real life middle class neighborhood and two lovers madly in love (Ved = madness).

The song is composed by Chinar-Mahesh. They have created the true modern but still a warm in heart melody for this song. Swapnil Bandodkar is one reliable performer in Marathi movies now. The true surprise in this song is the beautiful voice of Ketaki. We all knew she has a great voice but this song gives her great exposure to the mainstream singing besides kids' songs. She has handled the music very well and complimented Swapnil's voice. You can say on screen and in singing she has became a true celebrity of Marathi film industry in no time.





Enjoy!!         

Monday, November 25, 2013

Laage Re Nain

The start of new season at Coke Studio Pakistan and we already have the song giving goosebumps. This song is a traditional Bandish based on Raag Bhupali. There are many renditions of this bandish but Rohail Hyaat has produced it to suit western instruments. The new version sung by Ayesha Omar has became a great lounge pleaser.

The husky voice of Ayesha suits the song very well and she has sung it nicely. The sarangi piece at the start is a great way to introduce the bandish and Ayesha's voice mellows perfectly with that sarangi intro. It is a simple and melodious song without much complexities and that is the catching point for the song.




Enjoy!!

Thursday, May 16, 2013

Jeene Laga Hoon ...

Now you will think I am advertising all Tips movies - but the fact is they are making some good movies with great songs. And this one is again following the path of great love songs - Ramaiya Vastavaiya - the new movie by Prabhudeva. This is the remake of his directional debut from Telugu. I would say a good launching pad for producer's son!

The song is again composed by Sachin-Jigar - this year's hot favorite. For a teaser I am going to write about one another song composed by them - but that's later. Looks like they are filling in the gap created by exit of two great pairs  Nadeem-Shravan and Jatin-Lalit very nicely. Voiced by Shreya Ghoshal and Atif, this song follows a romantic melody and takes you in the clouds of fresh love. It feels like you are surrounded by the mist of early morning dew and you are looking at your love while the nascent rays of sun playing with her still wet hair. I was always arguing about need of a good love story with fresh faces for Bollywood and I have a good feeling that chemistry between Girish Kumar and Shruti Haasan will make this movie a memorable one.






Enjoy!!




         

Tuesday, May 7, 2013

Balam Pichkari ...

I normally don't write about Pritam's songs here but this song made me write about it as it is stuck in my head for some time now. Holi songs are not new for Hindi movies and this song follows that trend. Evergreen song from Sholey to the new version of Akshay Kumar, Holi songs are hot favorite for capturing the youth mind. This song captivates it perfectly. Add that with a great chemistry between Ranbir and Deepika. She is the only second actress after Anushka Sharma to look so comfortable in doing any song. I don't want to compare but these two has brought back some magic of Hema malini and Vaijayanti mala - dancing freely on the great tunes.

Well going back to song - a great catchy tune with use of base to amplify the sound of dance! Pritam makes it even better using voice of Shalmalee Kholgade and Vishal Dadlani. Vishal has sung many good songs recently and his voice is used perfectly in this song. I would just say that listen to this song and you will land in your childhood/youth playing Holi with some dance and lots of colors!!









Enjoy!! 

Friday, April 19, 2013

गीत रामायण - Geet Ramayan


कालच आई म्हणाली आज रामनवमी आहे जरा नमस्कार कर तो चांगली बुद्धी देईल. आता आम्ही कधी तिचा सल्ला ऐकतो कधी नाही ऐकत पण आज काही तरी वेगळेच होते. चेहरे पुस्तकावर एक श्लोक वाचला आणि कळले की हे गीत रामायणातील राम जन्माचे गीत आहे. गीत रामायणातील काही गीते मधून मधून ऐकली होतीच पण निदान माझ्या पिढीला तरी गीत रामायण काय आहे हे कमीच माहिती आहे. ग दि मा आणि सुधीर फडक्यांनी रचलेली गीते आहेत एवढे माहिती होते. मग काय शोधाशोध सुरु झाली आणि हाती लागला खजिना. गीत रामायणाच्या सुवर्ण महोत्सवासाठी सकाळ ने आयोजित केलेल्या सुश्राव्य कार्यक्रमाचे चित्रीकरण तू-नळीवर सापडले. आणि मी ते ऐकण्यात हरवून गेलो.    

१ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणीवर या महायज्ञाची सुरुवात झाली आणि एका वर्षानंतर एप्रिल १९५६ मध्ये शेवटचे गीत प्रसारित झाले. महाभारत आणि श्रीकृष्ण दूरदर्शन वर पाहिल्यामुळे दर आठवड्याला नवीन भाग पाहण्याची किंवा ऐकण्यातली जी हुरहूर सर्व घराला असते ती मी अनुभवली आहे. म्हणून फक्त कल्पना करू शकतो त्यावेळेस सर्वजण किती आतुरतेने नवीन भागाची वाट पाहत असतील. गीत रामायणाची कीर्ती इतकी वाढली की नंतर वर्तमानपत्रेही नवीन गीत दर आठवड्याला छापू लागली. ग दि मांची रसाळ भाषाशैली आणि बाबूजींचे श्रवणीय संगीत असा एक दैवी संग गीत रामायणात घडून आला. त्याचबरोबर गायला सुधीर फडके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर आणि अजूनही बरच प्रथितयश गायक मिळाले. 

चैत्र मास त्यात शुद्ध नवमी हि तिथी, 

गंध युक्त तरीही वाट उष्ण हे किती. 

दोन प्रहरी का ग शिरी सुर्य थांबला … 

राम जन्मला ग सखे …राम जन्मला

राम जन्माचे किती सुंदर वर्णन आहे यात. अशीच सुंदर संपूर्ण ५६ गाणी ग दि मांनी लिहिली. ज्यांनी खरच त्याकाळी आकाशवाणीवर ऐकले त्यांचा थोडा हेवा वाटतो आहे पण जे अटल बिहारी वाजपेई म्हणत होते "आपण सर्व तर या काळात विरून जाऊ पण गीत रामायण असेच वर्षानुवर्षे टवटवीत राहील". मला महिती नाही माझ्या पिढीतील आणि माझ्या नंतरच्या किती लोकांना हा सुंदर ठेवा माहिती आहे - म्हणून हा एक छोटा प्रयत्न पुनश्च ओळख करून देण्याचा. 

बरोबर तू-नळी वरील चित्रीकरण देतो आहे. ते ऐकून आनंद घ्या हो आणि सुधीर फडक्यांच्या आवाजातले मूळ मिळाले तर अजूनच आनंद द्विगुणीत होईल. 

(धन्यावाद - मिनल देवस्थळे)